मुंबई मेरी जान :कंगनावर संतापले मराठी कलाकार; मुंबई पोलिसांसाठी मराठी कलाकार एकत्र

0
219

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल नेटवर्किंगवरुन संताप व्यक्त केला जात आहे. याच वक्तव्यावरुन आता कंगनाला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुनावलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे. मुंबई’वर मनापासून प्रेम करणाऱ्या मराठी कलाकार कंगनाच्या या विरोधात एकवटले आहेत. मुंबई’वर मनापासून प्रेम करणाऱ्या मराठी कलाकार कंगनाच्या या विरोधात एकवटले आहेत. मराठी कलाकारांनी कंगनाला आपल्या ट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे.

सई ताम्हणकरने आपल्या ट्विटमध्ये फक्त,’मुंबई मेरी जान!’ असं म्हणतं #कर्मभूमी #ILoveMumbai #विषयसंपला हे हॅशटॅग वापरले आहेत.

 

कंगना हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. ‘मुंबई हिंदुस्तान है’ असे त्याने म्हटले आहे.

आघाडीचा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यानेही, “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा”, असं म्हणत कंगनाला सुनावलं आहे. यापूर्वी रेणुका शहाणेनेही “उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असं ट्विट करत कंगनाच्या वक्तव्याचा समचार घेतला.

मराठी अभिनेता जितेंद्र जोशी यांनीही ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, मान दिला आणि जगण्याला अर्थ दिला त्या माझ्या मुंबई शहराचा मला अभिमान आहे. जे जे आले त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवाला आहे या शहराने. कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai अशा ट्विटच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे.

 महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे. ऊर्मिला यांनी ट्वीट करून कंगनावर तिखट शब्दांत हल्लाबोल चढवला आहे.