कंगनाशी नाही आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे विसरू नका ; देवेंद्र फडणवीस

0
364

महाराष्ट्र सरकारला असे वाटते की, कोरोनाची लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचे आहे, असा टोमणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला मारला आहे. सरकार कंगनासोबत लढण्यासाठी जेवढी शक्ती वापरते आहे त्याच्या ५० टक्के जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तरी लोकांचे जीव वाचतील, असे ते म्हणाले. तसंच दाऊदच्या घरावर कारवाई केली नाही पण अभिनेत्रीच्या घरावर केली अशी टीकाही त्यांनी केली.

देशातील कोरोनाच्या रुग्णांपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. पण कोरोनासोबत लढायचे सोडून सरकार कंगनाशी लढते आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. कंगनाचा मुद्दा भाजपाने उचललेला नाही, असे सांगून फडणवीस यांनी सरकारला विचारले – तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली? वाद राष्ट्रीय स्तरावर जाईल इतके महत्त्व कशाला दिले? तिचे घर का तोडले? कंगना भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.

या सरकारला आता करोना नाही कंगनाशी लढायचं आहे असं वाटतंय. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यांना कोणती चौकशी करायची आहे ते करु शकतात. कंगनानेही ते सांगितलं आहे. पण कुठेतरी गांभीर्याने करोनाकडे लक्ष द्या. जितक्या तत्परतेने कंगनाची चौकशी करु वैगेरे सुर आहे त्यापेक्षा जास्त करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यातील ५० टक्के क्षमता तरी करोनाशी लढण्यात वापरा, कदाचित लोकांचा जीव वाचवण्यात मदत मिळेल”.