बिहार निवडणूक :बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर,तीन टप्प्यांत होणार निवडणूक

0
304

निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होईल. यापैकी पहिल्या टप्प्यांत ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात अनुक्रमे २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. यानंतर १० नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होईल.

एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदारच करु शकणार मतदान
निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 7 लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर 46 लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर 6 लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील. एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील. आयोगानं म्हटलं की, कोरोना काळात बिहारमध्ये सर्वात मोठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं की, निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना केवळ दोन गाड्यांची परवानगी असणार आहे.

१० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकालाचा निकाल जाहीर होणार

बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार
– पहिल्या टप्प्यात – ७१ मतदारसंघ मतदान
– दुसऱ्या टप्प्यात – ९४ मतदारसंघ मतदान
– दुसऱ्या टप्प्यात – ७८ मतदारसंघात मतदान

  • सिक्युरिटी डिपॉझिटही ऑनलाईन जमा करावं लागेल. यंदा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली
  •  सर्व मतदान केंद्र तळ मजल्यावरच असतील. उमेदवारांबद्दल वेबसाईटवर माहिती द्यावी लागेल. उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक केली जाईल
  •  सोशल मीडियाचा वापरदेखील एक आव्हान आहे. सोशल मीडियाद्वारे कुणीही समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल
  •  यंदा निवडणुकीसाठी केवळ व्हर्च्युअल प्रचार केला जाईल. मोठ-मोठ्या जनसभा भरवता येणार नाहीत : निवडणूक आयुक्त
  • उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत दोन हून अधिक वाहनं येणार नाहीत
  •  बिहार विधासभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं भरता येतील
  •  विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारासहीत एकूण केवळ पाच लोक ‘डोअर टू डोअर’ कॅम्पेनमध्ये सहभागी होतील. पाचहून अधिक लोक घरोघरी जाऊन प्रचार करणार नाहीत.