भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? हा दिवस का साजरा केला जातो?

0
1775

आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.

का साजरा केला जातो हा दिवस

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 जवान गस्त घालत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा जणांना वीरगती प्राप्त झाली होती. या घटनेने देशात दु:खाची लहर पसरली होती. वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

सामान्य व्यक्तींना पोलिसांच्या कामाची ओळख व्हावी. तसेच पोलीस मधील तरुण मंडळींना प्रेत्साहन देणे, हा यामागील उद्देश्य आहे यावेळी कर्तव्यावर असतांना जे पोलिस शहिद झाले. त्यांना अभिवादन केले जाते. समाजाच्या सुरक्षेसाठी आहोरात्र झटणाऱ्या पोलिस दलाची माहीती नागरीकांना व्हावी हा देखील या पाठीमागचा एक उद्देश आहे

महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली आहे. ‘हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.’ असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी अभिवादन केले आहे.