कृषी क्षेत्रामध्ये सुधारणांचा सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार – पंतप्रधान मोदी

0
278

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (FICCI) च्या 93 व्या वार्षिक बैठक (AGM) आणि वार्षिक संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून संबोधित केले. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना जेवढा सपोर्ट मिळेल, आपण जेवढे इन्वेस्ट करु, तेवढाच देश आणि शेतकरी मजबूत होईल. सरकारला आपला हेतू आणि धोरणासह शेतकऱ्यांचे हित हवे आहे.गेल्या काही दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या दरम्यान, कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

‘शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल’
आज भारताचे अॅग्रीकल्चर सेक्टर पहिल्यापेक्षा जास्त वायब्रेंट झाले आहे. आज शेतकऱ्यांजवळ मंड्याच्या बाहेर विकण्याचा ऑप्शनही आहे. ते डिजिटल माध्यमातूनही खरेदी-विक्री करु शकतात. शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल.

शेतकऱ्यांना नवीन बाजार आणि पर्याय मिळतील

कृषी क्षेत्रातील सुधारणांचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. अॅग्रीकल्चर सेक्टर आणि त्यासंबंधीत क्षेत्र मग ते फूड प्रोसेसिंग असो, कोल्ड चेन असो, यांच्यात भिंती असायच्या. आता या अडचणी दूर होत आहेत. आता शेतकऱ्यांना नवीन बाजार आणि नवीन पर्याय मिळतील. कृषी क्षेत्रात जास्त गुंतवणूक होईल.

परिस्थिती जितक्या वेगाने खराब झाली तितकीच जलद सुधारली
आम्ही टी -20 सामन्यात बरेच बदल पाहिले आहेत. पण या 20-20 च्या वर्षाने सर्वांना पराभूत केले आहे. जग बर्‍याच चढउतारांवरुन गेले आहे, काही वर्षांनंतर जेव्हा आपल्याला कोरोना कालावधी आठवेल तेव्हा त्यावर आपण विश्वास ठेवणार नाही. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की परिस्थिती जितक्या वेगाने खराब झाली तितकी जलद सुधारणा देखील होत आहे.

‘सध्याचे इंडिकेटर्स प्रोत्साहन वाढवणारे’
पंतप्रधान म्हणाले की जेव्हा महामारी सुरू झाली तेव्हा बरीच अनिश्चितता होती. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न होता की सर्व काही कसे ठीक होईल? जगातील प्रत्येकजण या प्रश्नांमध्ये सामील होता. आता परिस्थिती बदलली आहे. आता उत्तर आणि रोडमॅप आहे. आता इंडिकेटर्स प्रोत्साहित करत आहेत. संकटाच्या वेळी आपण जे शिकलो त्याने भविष्यातील संदर्भांना दृढ केले. याचे श्रेय आंत्रप्रेन्योर, शेतकरी, उद्योजक आणि लोकांना जाते. जो देश महामारीच्या काळात आपल्या लोकांना वाचवतो, तेथील व्यवस्था दुप्पट ताकदीने रिबाउंड करण्याची ताकद ठेवतात.

परदेशी गुंतवणुकीचा विक्रम

“गेल्या सहा वर्षांमध्ये जगाचा भारतावरील विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तर हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. एफडीआय असेस किंवा एफपीआय परदेशी गुंतवणुकदारांनी भारतात विक्रमी गुंतवणूक केली आहे आणि आता गुंतवणूक सुरूच आहे,” असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.