तुकाराम बीज सोहळ्याला भाविकांना बंदी; नवी नियमावली जाहीर

0
250

राज्यात मागील बऱ्याच दिवसांपासून कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नियम पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. ज्या धर्तीवर परंपरागत चालत आलेल्या सोहळ्यांवरही कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे.

यामुळे राज्यभरात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. आषाढी, कार्तिकी, माघी यात्रेनंतर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यासाठी देखील भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वारकरी संप्रदायात देखील तीव्र नाराजी आहे. मात्र, कोरोनाचा वाढत धोका लक्षात देहूतील या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नियमावली जाहीर केली आहे. तर, परंपरागतरित्या सोहळा साजरा केला जाणार असून, त्यात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही.

30 मार्चला होणाऱ्या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी तशी नियमावली जाहीर केली आहे.

ही नियमावली खालीलप्रमाणे

1) केवळ पन्नास भाविकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी

2) पन्नास भाविकांच्या उपस्थीतीच सर्व विधीवत पूजा पार पडणार

3) उपस्थित राहणाऱ्या भाविकांचे पोलीस पास बनवून घ्यावे लागणार

4) उपस्थित राहणाऱ्या पन्नास भाविकांची कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक

5) विश्वस्तांनी भाविकांना देहूत न येण्याचं आवाहन करावं

6) घरी बसून भाविकांना दर्शन घेता यावं, यासाठी लाईव्हची सुविधा उपलब्ध करावी

7) संचारबंदी लागू केली जाणार