IPL 2021: 90 मिनिटात खेळ संपवण्याचे बंधन, IPL साठी BCCI चे नवे नियम

0
289

9 एप्रिलपासून IPLच्या हंगामाला सुरुवात होत आहे. 30 मे रोजी शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. IPL सुरू होण्यासाठी BCCI ने काही नियम बदलले आहेत. कोरोनाचे नियम तर संघाना पाळावेच लागणार आहेत त्याशिवाय खेळामधील 5 नियम बदलल्यानं संघांवर थेट त्याचा परिणाम होणार आहे. BCCIने कोणते नियम बदलले आहेत आणि नवीन नियम काय आहे जाणून घेऊया.

90 मिनिटांत संपवावा लागणार सामना

नव्या नियमानुसार आता 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. फलंदाजी करणारा संघ जर टाइमपास करत राहिला तर त्याचा फटका गोलंदाजी करणाऱ्या संघाला बसू शकतो. त्यांची फलंदाजीची संधी येईल त्यावेळी वेळ कमी करण्यात येणार असल्याची ताकीद बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सामना ठरवून दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याचा नियम बदलला आहे.

सॉफ्ट सिग्नल नाही

इंग्लंड विरुद्धच्या खेळल्या गेलेल्या सामन्या दरम्यान सॉफ्ट सिग्नलवरून खूप वादंग निर्माण झाला होता. सॉफ्ट सिग्नल IPLमध्ये मान्य नसेल. हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शॉर्ट रनबाबत नियम

विशेष म्हणजे बीसीसीआयने आता शॉर्ट रन नियमामध्येही बदल केला आहे. आता थर्ड अंपायर मैदावर असलेल्या अंपायरच्या निर्णयाबाबत विचार करुन मुख्य निर्णय बदलू शकतात.

फोर्थ अंपायरची ताकद वाढली

कोणताही संघ जर वेळ वाया घालवत असेल तर फोर्थ अंपायरची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. अशावेळी फलंदाजांना सूचना किंवा इशारा देण्याचा अधिकार फोर्थ अंपायरला देण्यात आला आहे. याशिवाय शिक्षा म्हणून ओव्हर-रेट नियम लागू करण्याचा अधिकार चौथ्या अंपायरला देण्यात आला आहे.

थर्ड अंपायरबाबतचा निर्णय

याशिवाय ऑन-फिल्ड अंपायरच्या निर्णयाचा तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर काहीच फरक पडणार नाही, असंही बीसीसीआयने सांगितलं आहे. याचाच अर्थ आता मैदानावरील अंपायरला मदतीसाठी थर्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची गरज राहणार नाही. हा निर्णय अंपायरिंगच्या हितासाठी घेण्यात आलाय जेणेकरुन थर्ड अंपायरला निर्णय जाहीर करताना कोणतीही अडचण येऊ नये. अंपायरच्या निर्णयावरुन निर्माण होणाऱ्या वादांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नो बॉल
नो बॉलचा निर्णयही थर्ड अंपायरकडे सोपवण्यात आला आहे. थर्ड अंपायरनं दिलेला निर्णय हाच अंतिम मानण्यात येईल.

सुपर ओव्हर
सामना टाय झाल्यानंतर दिलेल्या वेळेतच सुपरओव्हर पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी कोणताही वेगळा ज्यादा वेळ दिला जाणार नाही.