67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: कंगनाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार; मनोज वाजपेयी-धनुषला बेस्ट अभिनेत्याचा मान

0
175

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नुकतेच दिल्लीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. यावेळी ज्येष्ठ कलाकार रजनीकांत यांना सिनेमा जगतातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. यात कंगना रनोटला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांमध्ये अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तर मनोज वाजपेयीला ‘भोंसले’ आणि धनुषला को ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर हिंदी चित्रपट विभागात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला.

अभिनेता अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या सुपरहिट गाण्यासाठी गायक बी प्राक आणि मनोज बाजपेयी आणि दक्षिणेचा सुपरस्टार धनुष यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर, मराठमोळी गायिका सावनी रविंद्र हिला ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारतातील चित्रपट क्षेत्रात दिले जाणारे सर्वात महत्त्वाचे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांची निवड कशी केली जाते याबद्दल पुरस्कारांशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घ्या…

कसे निवडले जातात विजेते?
या पुरस्कारांसाठी, प्रथम चित्रपट निर्मात्यांकडून प्रवेशिका मागवल्या जातात, त्यानंतर सरकारकडून दोन्ही पुरस्कारांसाठी स्वतंत्र ज्युरी तयार केल्या जातात. ज्युरी सर्व चित्रपट पाहतात आणि प्रत्येक श्रेणीच्या आधारे अभिनेते आणि चित्रपटांची निवड केली जाते. यामध्ये सुमारे 90 पुरस्कार असून ते विविध श्रेणींमध्ये दिले जातात. यात वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, विशेष चित्रपट, सर्वोत्तम लेखन, चित्रपट अनुकूल प्रदेश, विशेष उल्लेख इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये चित्रपट आणि कलाकार दोन्ही निवडले जातात.

निवड प्रक्रियेदरम्यान ज्युरींचे विचारविनिमय काटेकोरपणे गोपनीय असतात, जे सदस्यांना बाहेरील प्रभावापासून दूर ठेवण्यास मदत करतात आणि पुरस्कार विजेत्यांची निवड पूर्ण स्वातंत्र्य, निष्पक्षतेने केली जाते.

कोण देतं पुरस्कार?
तसे, राष्ट्रपतींद्वारे दिल्या जाणऱ्या पुरस्कारांमध्ये यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जात असले, तरी काही वर्षांपासून उपराष्ट्रपती किंवा माहिती व प्रसारण मंत्रीही हे पुरस्कार प्रधान करत आहेत. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला उपस्थित नसतानाही काही पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते तर काही पुरस्कार तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले, तेव्हाही मोठा गोंधळ झाला होता. या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे पुरस्कार प्रदान करत आहेत.

यापुर्वी या पुरस्काराचा सोहळा दरवर्षी 3 मे रोजी आयोजित केला जात होता, परंतु लोकसभा निवडणूक 2019 आणि कोरोनामुळे त्याची कोणतीही निश्चित तारीख नव्हती. 50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.