operation devi shakti : अफगाणिस्तानमधील बचाव मोहीमेला भारताने दिले ‘ऑपरेशन देवी शक्ती’ नाव

0
362

तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी भारताची बचाव मोहीम सुरू आहे. रोज वेगवेगळ्या विमानांद्वारे अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशात आणलं जात आहे. भारतीयांना वाचवण्यासाठी सुरु असलेल्या बचाव मोहिमेला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ (Operation Devi Shakti) असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ असे नाव दिले आहे. हे नाव कसे अस्तित्वात आले याची माहिती सूत्रांनी दिली. ऑपरेशनशी संबंधित सूत्रांनी सांगितले की हे नाव निवडले गेले कारण हा निष्पाप लोकांना हिंसाचारापासून वाचवण्याचा हा एक प्रयत्न आहे, ज्याप्रमाणे ‘माँ दुर्गा’ निरपराध लोकांना राक्षसांपासून वाचवते, त्याचप्रमाणे काबूलमधून निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले आहे.

तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा करताच भारताने अतिशय कठीण स्थितीत दुसऱ्याच दिवशी १६ ऑगस्टला काबुलमधून ४० भारतीयांना सुरक्षित मायदेशात आणले होते. अफगाणिस्तानमधील स्थिती भीषण होत चालली असून अनेक देश आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशात नेत आहे. भारतानेही आतापर्यंत ८०० भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलं आहे.

नुकत्याच झालेल्या सीसीएस बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळाला निर्देश दिले होते की, अफगाणिस्तानातील लोकांच्या बचाव कार्याला मानवी दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ते म्हणाले की, केवळ हिंदू आणि शीख सारख्या अल्पसंख्यांकांना अफगाणिस्तानातून विविध विमानांनी परत आणले पाहिजे असं नाही, तर अनेक अफगाण नागरिकांनीही या संकटकाळात भारतात येण्याचा पर्याय निवडला आहे, त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाऊ नये.

तालिबानने वेढलेल्या काबूलच्या ताजिक शहरातून बाहेर काढल्यानंतर भारताने मंगळवारी आपल्या 25 नागरिकांना आणि अनेक अफगाणी शीख आणि हिंदूंसह 78 लोकांना दुशांबेमधून परत आणले. शीख धर्मग्रंथ, गुरु ग्रंथ साहिबच्या तीन प्रतींसह हा गट सोमवारी भारतीय हवाई दलाच्या लष्करी वाहतूक विमानाने काबूलहून दुशांबेला रवाना झाला. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि व्ही मुरलीधरन यांनीही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकांचे स्वागत केले.

ऑपरेशन अद्याप संपलेले नाही आणि हे ऑपरेशन देवी शक्ती पुढील काही दिवस चालू राहण्याची अपेक्षा आहे.